मुंबई : काही दिवस कोरोनाची रुग्ण संख्येमध्ये होणारी वाढ कमी झाली होती. पण आज राज्यात पुन्हा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासात राज्यात १४,४९२ रुग्ण वाढले आहेत. तर ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकूण  १२,२४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४,५९,१२४ जण बरे झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७१.३७ टक्के झालं असून मृत्यूदर ३.३२ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत ३४,१४,८०९ जणांची टेस्ट झाली असून त्यातील ६,४३,२८९ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 


सध्या राज्यात ११,७६,२६१ जण होमक्वारंटाईन आहेत. तर ३७,६३९ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात कोरोनाचे १,६२,४९१ रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ६,४३,२८९ इतकी झाली आहे.