मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आपण बाबरी मशिद पुन्हा बांधण्यासाठी अयोध्येला जाऊ असा इशारा अबू आझमींचा मुलगा फरहान आझमीने दिलाय. ते राममंदिर बांधणार असतील तर आम्ही बाबरी मशिद पुन्हा बांधू असा इशारा आझमींनी दिला आहे. 


उद्धव ठाकरेंनी अयोध्येचं तिकीट काढलं, तर आम्ही अयोध्येला पायी जाऊ असा इशारा फरहान आझमींनी दिला आहे. सरकारला १०० वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही सिद्धीविनायकाला का जात नाही, सिद्धीविनायकावर तुमचा विश्वास नाही का? असा सवाल फरहान आझमींनी विचारलाय. तर अबू आझमी यांनी तातडीने फरहान आझमी यांचं विधान फेटाळत निषेध नोंदवला आहे.