मुंबई : नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येतेय. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थींना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही ? याबाबत येत्या एक - दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.