मुंबई : उत्तर महाराष्ट्र - खान्देशातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचा निकाल लागला आहे. जळगावमध्ये भाजपने निर्विवाद विजय मिळवला आहे. महापालिकेत सत्तेत जे खंबीर नेतृत्व समजले जाणारे सुरेश जैन यांचा दारूण पराभव या निवडणुकीत झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावकरांनी शिवसेना आणि सांगलीकरांनी काँग्रेस राष्ट्रवादीला साफ नाकारलं आहे, सांगलीचे जयंत पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती, पण त्यांना सत्ता टिकवण्यात यश आलं नाही, सांगलीचे आकडे हे शेवटपर्यंत अस्थिर होते. 


कुणाची सत्ता येईल हे सांगता येत नव्हतं, अखेर चुरशीच्या लढाईत सांगलीत भाजपने बाजी मारली. जळगावात गिरीश महाजन यांनी नेतृत्व सिद्ध केलं. जळगाव शहरात सुरेश जैन यांचा दबदबा गिरीश महाजन यांनी मोडीत काढला. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाने सर्वत्र वातावरण तापलं असताना, सत्ताधारी भाजपाच्या पारड्यात मतदारांनी मतं टाकली, हे देखील विशेष म्हटलं जात आहे.