चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी अतिशय संतापजनक बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळेस मध्य रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोलंबा झाला आहे. तब्बल तासाभरापासून वाहतूक विस्कळीत असल्याचं समजतंय. (kalyan kasara railway traffic disrupted due to engine failure of goods train between umbarmali khardi station)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कल्याण-कसारा रेल्वे  वाहतूक विस्कळीत झाली आहे. उंबरमाळी खर्डी रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिन मध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे गेल्या पाऊण तासांपासून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. या सर्व प्रकारामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान थोड्याच वेळात वाहतूक पूर्वपदावर येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.