मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वनरक्षक स्वस्तिक बबनराव काटकर पेट्रोलिंग करत असताना तुलसी तलावाजवळ बसले होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात वनरक्षक स्वस्तिक काटकर यांचा मृत्यू झाला. वनरक्षक स्वस्तिक काटकर हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद गावचे आहेत.