मुंबई  : मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी. शहरातली दारुची दुकानं आणि बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आधीचा बंदी आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामर्गांवर दारुबंदी नसणार आहे. अर्थात परवानाधारक दारुची दुकानंच सुरू ठेवता येणार आहेत. 


राज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारुबंदी नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने  दिलाय. वाढते अपघात लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०१५ मध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या आणि पाचशे मीटर परिघातल्या दारुच्या दुकानांवर बंदी घालण्यात आली होती. आता या आदेशात सुधारणा करण्यात आलीय.