मुंबई : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर वरुणाराजची कृपा कायम राहणार आहे. त्यात मराठवड्यातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यताय. 


आज सकाळी सहापर्यंत मुंबईशहरात 94.36 मिलीमीटर, पूर्व उपनगरात १०० मिलीमीटर, पश्चिम उपनगरात ११० मिलीमीटर पावसाची नोदं करण्यात आलाय. दरम्यान सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. 


भरतीच्यावेळी 4.68 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताय. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भरतीच्या काळात मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.