कल्याण: आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतो त्याने आपल्या जिव्हारी लागेल असं काही केलं की मोठा धक्का बसतो. त्यातून सावरणं कठीण होतं आणि मग चुकीची पावलं उचलली जातात. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईजवळ कल्याणमध्ये घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेयसीसोबत कडाक्याचं भांडण झालं ती त्याला वाट्टेल तसं बोलली. एक मर्यादेनंतर संताप अनावर झाला आणि अखेर ते शब्दही ती बोलून मोकळी झाली. जे या तरुणाच्या काळजाला भोकं करून गेले.  


प्रेयसीशी झालेल्या वादानंतर एका तरुणानं फेसबुक लाईव्ह करून नंतर आत्महत्या केली. कल्याणच्या बेतुरकरपाडामधली ही घटना आहे. मला तुझी गरज  नाही, तू मर जा असं प्रेयसीने बोलताच अंकुश पवार यानं हे टोकाचं पाऊल उचललं. व्हिडिओ पाहून मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली, मात्र उशीर झाला होता. 


मूळचा जालन्याचा अंकुश खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. त्याचं प्रेयसीसोबत भांडण झालं. तिने रागात  मला तुझी गरज  नाही, तू मर जा असं म्हटलं. त्यानंतर अंकुश पूर्ण कोलमडला. ते शब्द त्याच्या जिव्हारी लागले आणि त्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.