ठाणे : बदलापूर, शहापूर, मुरबाडच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले होते मात्र आजच्या पावसाने सर्वच जण सुखावले आहे. बच्चे कंपनीने देखील पावसाचा मनसोक्त आनंद घेतला आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यात वादळी वारा सुटला आहे. डोंबिवली, कल्याण भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. मुंबईत देखील वातावरण बदललं आहे. मुंबई आणि उपनगरात ढगाव वातावरण तयार झालं आहे.


सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी, कराड, पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वा-यासह विजेच्या कडकडाटासह पाउस झाला. जोरात वाहणा-या वा-यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं असून शेकडो एकरातील पपई जमिनदोस्त झाली आहे. कराड शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्यानं २२ एकर क्षेत्रातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.