Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण (Reservation) दिले जाऊ शकते आणि त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे, असं मत या बैठकीत मांडण्यात आलं. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत,  घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात आलं. तसंच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही सहकार्य करावे. आपले उपोषण मागे घ्यावे, असं आवाहन करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याबद्दल सर्वपक्षीय बैठकीत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. जरांगेंची विशेष अधिवेशनाची मागणी होती, त्यावर निर्णय झालेला नाही. टिकणारं आरक्षण देण्यावर सर्व पक्षांचं एकमत झालंय. जरांगे पाटलांनी सहकार्य करावं, उपोषण सोडावं असं आवाहन सर्वपक्षीयांनी केलंय. राज्यातली कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यावरही सर्वपक्षीयांचं एकमत झालंय. 


सर्व पक्षांचे नेते हजर


मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तसंच राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैटकी झाली. या बैठकील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. राज्यात शांतात राहण गरजेच आहे. पोलिस यंत्रणाना त्रास देणं योग्य नाही. सर्वपक्षाने एकत्रित राहून शांतात कायम राहील कशी यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मत या बैठकीत शरद पवार यांनी मांडलं. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यातील हिंसेच्या घटना अयोग्य असून घटनांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. तसंच हिंसेंच्या घटनांमुळे आंदोलनाचा बदनामी होत असून राज्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन करण्यात आलं. बैठकीनंतर मुख्यमंत्रीय एकनाथ शिंदे यांनी मीडियाला याबाबतची माहिती दिली.


आरक्षणासाठी मंत्रालयाला टाळं
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाला टाळं ठोकणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आमदारांनी मंत्रालयाच्या पाऱ्यांवर आंदोलन केलं. विशेष अधिवेशनाची मागणी करत या आमदारांनी मंत्रालायाला टाळं ठोकलं होतं. काल मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन  करणारे आमदारही आजच्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी या आमदारांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली..