देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, नवी मुंबई : वाशीमध्ये महाराष्ट्र भवन साकारणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी इथल्या प्रस्तावित महाराष्ट्र भवनाच्या जागेवर जल्लोष केला. फटाके फोडून आणि पेढे वाटून मनसे कार्यकर्त्यांनी या घोषणेचं स्वागत केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर सर्व राज्याची वाशी इथे भवन असताना महाराष्ट्र भवन का साकारलं जात नाही? असा प्रश्न मनसेकडून उपस्थित केला जात होता. गेली अनेक वर्ष मनसे याचा पाठपुरावा करत होती. तसंच यासाठी आंदोलनंही केली जात होती. 


महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत, नवी मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी महाराष्ट्र भवन उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे ते तात्काळ व्हावे अशी मनसेची मागणी होती. अर्थ संकल्पात महाराष्ट्र भवनाची घोषणा झाल्याने मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.