मुंबई : मुंबईत शनिवार सकाळपासून पुन्हा एकदा जोर धरला. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार कायम आहे. शनिवारी रात्री जोगेश्वरीमध्ये एका सोसायटीत एक भिंत पडून अनेक वाहनांचं नुकसान झालय. या घटनेत सुदैवाने जीवीतहानी झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान भिंत पडून त्याखाली सहा कार आणि एक मोटरसायकल दबली गेली. स्थानिकांच्या माहितीनुसार ही इमारत सुमारे तीस वर्ष जुनी होती, सलग पड़त असलेल्या पावसामुळे ही भिंत कोसळल्याचं सांगण्यात येतय.


ठाण्यात झाड कोसळून पाच वाहनांचं नुकसान


ठाण्यात रविवारी सकाळी झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान झालंय. ठाण्यातील इटर्निटी मॉलच्या जवळ ही घटना घडलीय. झाड कोसळून एकुण पाच वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाहीये. झाड हटवण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहे.