मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेत दैव बलवत्तर म्हणून आमचे प्राण वाचले असे उद्गार विमान दुर्घटना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणच्या मजुरांनी काढले आहेत. गुरुवारी दुपारी घाटकोपर इथे विमान दुर्घटना झाली. ही दुर्घटना एका निर्माणधिन असलेल्या इमारतीत झाली. बांधकामावर असलेल्या मजुरांची जेवणाची सुट्टटी झाली म्हणून त्यांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला. विमान कोसळलं तेव्हा दहशतवादी हल्ला झाल्याचं समजून अनेकांनी पळ काढला. पण सत्य नंतर समोर आलं.