मुंबई : एकीकडे पावसाचे ढोल आणि दुसरीकडे गणरायाच्या स्वागताचे ढोलताशे असं चित्र मुंबईत दिसलं. मुंबईत सकाळी रिमझिम असलेला पाऊस जसा वाढला, तसा जोरात आणि दुसरीकडे गणरायांच्या भक्तांचा जोशही वाढला. 


पावसामुळे गणपतीला छत्रीमधून नेताना थोडी तारांबळ उडाली. पण गणेशाच्या स्वागतात कोणतीही कसर पडली नाही.  उलट गणरायाच्या स्वागताला वरूणाराजाही आल्याने गणेशभक्त चांगलेच सुखावले. लालबागमध्येही आज दुपारी पडलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती, मात्र तासभर पाऊस थांबल्याने, गणेशभक्तांना दिलासा मिळाला.