नवी दिल्ली : मुंबई ड्रग्ज केसमध्ये दररोज नवीन बाबी समोर येत आहेत. NCB चे क्षेत्रिय डायरेक्टर समीर वानखेडे यांना आर्यन खान सह इतर 6 प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आले आहे. आता एनसीबीची एसआयटी या प्रकरणांचा तपास करणार असून याकरीता एसआयटीची टीम मुंबईत पोहचणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनसीबीची एसआयटी आज सकाळी 9.30 ला एअर इंडियाच्या प्लाइटने मुंबई पोहचली आहे. या एसआयटीचे हेड आणि DDG ऑपरेशन संजय सिंह हअसतील ते आपल्या टीमसह मुंबईत पोहचले आहेत.


दिल्लीत काय हालचाली?
या प्रकरणी मुंबईत दररोज घडामोडी सुरू आहेत. परंतु राजधानी दिल्लीत देखील हालचालींना वेग आला आहे. दरम्यान आर्यन खान प्रकरणातील एक तपास अधिकारी आशीष रंजन प्रसाद यांची एनसीबीच्या विजिलेंस टीमने चौकश केली. आशीष रंजन यांची चौकशी करण्याची ही दुसरी वेळ आहे.