मुंबई : मुंबईत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यासोबतच नेतेमंडळींनाही बसला आहे. जवळपास ४८ तासांहून अधिक काळ सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन एकिकडे ठप्प झाली तर, दुसरीकडे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. राष्ट्रवादी काँग्रेस नेते, प्रवक्ते नवाब मलिक यांनाही हा त्रास सहन करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून मलिक यांनी त्यांच्या घरात पाणी साचल्याचे काही फोटो पोस्ट केले. माझं घर.... असं लिहित त्यांनी घरातील काही फोटो पोस्ट केले. या पोस्टमध्ये त्यांच्या घरात गुडघ्यांपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. मलिक यांनी 'करुन दाखवलं' असं लिहित या पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.