मुंबई : मराठा आंदोलकांच्या आडमुठेपणामुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय... तशा आशयाची ऑडिओ क्लीप व्हायरल झालीय. या ऑडिओ क्लीपमध्ये मराठा संघटनेच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यासोबत झालेल्या संवादामध्ये नितेश राणे यांनी मराठा संघटनांमधल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक जाणून बुजून टाळल्याचा आरोप केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांना दगा दिला इतकंच नाही तर काही समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचाही गौप्यस्फोट या क्लिपमध्ये करण्यात आलाय. 'परळीहून काही जण महामंडळं आणि इतर मागण्या घेऊन आले होते पण आम्ही त्यांना विरोध केला. कारण मुख्य मागणी मराठा समाजाविषयी असेल' असा दावाही नितेश राणेंनी केलाय. 


ही वेळ राजकारण करण्याची नसून एकत्र याचची आहे असं आवाहन देखील त्यांनी केलंय. मराठा संघटनेच्या अशा आडमुठेपणामुळे आपली आणि नारायण राणेंची नाहक बदमानी झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय.