मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेनं केलेल्या स्वबळाच्या भाषेबद्दल तुझं माझं जमेना अशी स्थिती असल्याचा पुनरुच्चार गडकरींनी केला.  ते मुंबईत मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदी सरकारने बांबू शेतीला दिलेल्या परवानगी मुळे राज्यातल्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल असं केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गडकरींनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू आणि त्याचे फायद्याची  यादीच वाचून दाखवली. शिवाय गरिबांना परव़डणारी घरं बांधण्याचा ध्यास घेतल्याचं गडकरींनी सांगितलंय. गरम पाण्यापासून सोफा बेड फुकट दिला जाणार आहे. घराची किंमत ३ लाख ५० हजार असेल असंही ग़डकरींनी म्हटलं.