मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांनी हालगर्जीपणा केला. त्याला सरकार जबाबदार असल्याचे सांगतानाच 'संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला', असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


प्रशासन आणि गावकऱ्यांच्या भांडणातून घडला प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भीमा कोरेगाव येथे जमलेल्या जमावार झालेल्या दगडफेकीनंतर राज्यभरात उमटलेल्या पडसादाच्या पार्श्वभूमिवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी प्रशासन आणि गावकरी यांच्यातील भांडणामुळे हा प्रकार घडला. जे लोक भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर आले होते त्याच्याशी या प्रकरणाचा काहीही संबंध नाही, असेही प्रकाश आंबेडकरांना या वेली सांगितले.


आंबेडकरांनी दिली महाराष्ट्र बंदची हाक


दरम्यान, 'घडलेल्या प्रकाराबद्दल राग तर आहेच. पण, कोणही कायदा सुव्यवस्था मोडून नये. राज्यात शांतता नांदली पाहिजे, असे अवाहन करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (बुधवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.'


सरकारने 'त्या' गावचे अनुदान बंद करावे


राज्य सरकारने घडल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या हिंदूत्ववादी संघटनांना सहकार्य करणाऱ्या कोरेगाव ते शिरूर आणि कोरेगाव ते चाकण या परिसरातील गावांचे सरकारी अनुदान राज्य सरकारने दोन वर्षांसाठी बंद करावे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केली.