मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले गुरु असलेल्या लालकृष्ण आडवाणी यांचा सन्मान करत नाहीत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. उलट काँग्रेसच आडवाणी यांना योग्य मान देत असल्याचा दावाही त्यांनी केला. मुंबईत काँग्रेसच्या बुथस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच आम्ही वाजपेयींविरोधात लढलो. मात्र ते आजारी असताना त्यांना रुग्णालयात जाऊन भेटणारा मी पहिला होतो, असं राहुल गांधी म्हणाले. तर नीरव मोदी, विजय मल्ल्या जसे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेले तसेच नरेंद्र मोदी देखील पळून जातील, असा टोला त्यांनी पंतप्रधानांचं नाव न घेता लगावला.