मुंबई : महाराष्ट्र हा छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा महाराष्ट्र आहे. मात्र, महाराष्ट्रातील मराठी माणसाला भडकवण्याचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज साहेब ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा आदेश दिलाय. पण, राज साहेब आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खुलं आव्हान आहे कि त्यांनी हनुमान चालीसा कुठेही न बघता म्हणून दाखवावी. जर तुम्ही खरे हिंदू असाल तर ती म्हणून दाखवालच.


राज ठाकरे काय किंवा ओवैसी काय या दोघांचा उद्देश एकच आहे. त्यांची मातृसंस्था एकच आहे. विकासाची ब्लू प्रिंट घेऊन राजकारणात उतरलेले राजसाहेब यांनी मातृसंस्थेच्या आदेशामुळे आज ती ब्लु प्रिंट बंद केली आहे.


मुस्लिम समाजाला भडकविण्याचे काम ओवैसी करत आहेत. तर इकडे महागाई, बेरोजगारी अशा मूळ मुद्दयांना बगल मारून हिंदू समाजाची माथी भडकविण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. ते ओवैसी मुस्लिमांना भडकवतात आणि महाराष्ट्रातले हे ओवैसी हिंदूंना भडकवतात, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केलीय.