मुंबई :  १ जुलैपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सगळ्या प्रमुख शहराचा दूध, भाजीपाला रोखू असा स्पष्ट इशारा आज खासदार राजू शेट्टींनी दिलाय. आजपासून राज्यात शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचंही शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.


सरकारला सत्तेचा माज आला आहे, त्यांना कसं नमवायचं हे आम्हाला ठाऊक असल्याचंही शेट्टींनी यावेळी म्हटलं आहे.