मुंबई : मुंबई विद्यापीठातील पेपर तपासणीबाबत राज्यपालांना आढावा घेतलाय. येत्या 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करा, असा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुखांना दिलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना हे आदेश देण्यात आले. मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणीवरुन सुरु असलेल्या घोळाबाबत राज्यपालांनी आज राज्यभवनावर आढावा बैठक घेतली. 


या बैठकीत निकालासाठी देण्यात आलेली ३१ जुलैची मुदत पाळा असे आदेश राज्यपालांनी कुलगुरुंना दिलेत. ४ जुलैला राज्यपालांनी याबाबत बैठक घेत निकालासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती.