मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल क्षेत्रांतील कामाबद्दल कौतुक केलं आहे. सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत हे विधान केलं आहे.



तसंच रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी जी-२० परिषदेत कोरोना विरुद्ध कृती करण्याच्या आवाहनावर देखील आनंद व्यक्त केला. पण त्याच वेळी राज्यातील भाजप नेत्यांना देखील टोला लगावला. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी याबाबत विधान केलं.