Maharashtra Politics : भाजपचे आमदार प्रसाद लाड( MLA Prasad Lad ) यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. प्रसाद लाड म्हणजे मूर्ख माणूस... असं म्हणत शिवरायांवरील वक्तव्यावरून छत्रपती संभाजीराजेंनी(Sambhaji Raje ) घणाघाती टीका केली आहे. तर, महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही इशारा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं म्हणत महाराजांचं बालपण रायगडावर गेलं असं देखील प्रसाद लाड म्हणाले. स्वराज्याची शपथही त्यांनी रायगडावर घेतली असं लाड म्हणाले. त्यानंतर लाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय. चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीनं दिलाय. त्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. 


प्रसाद लाड हा माणूस मूर्ख आहे त्या मूर्ख माणसाबद्दल बोललो तर मीच मूर्ख ठरेन असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय. संभाजी राजे यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर खरपूस समाचार घेतलाय


शिवरायांबद्दल बोलाल तर सोडणार नाही, मंत्रिपद गेलं खड्ड्यात अशा शब्दात पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाडांचं नाव न घेता इशारा दिलाय. शिवरायांबद्दल कुणी वाकडं तिकडं बोलत असेल तर मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला माफ केलं जाणार नाही. उठले सुटले उंबरसुंभे काहीही बोलतात, हे खपवून घेतलं जाणार नाही अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी प्रसाद लाडांवर घणाघात केला.