मुंबई : महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे संजय राऊत अजूनही नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या फेसबूक पोस्टमुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. संजय राऊत यांचा भाऊ सुनिल राऊत यांना मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती, पण संजय राऊत यांनी हे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर आता ही फेसबूक पोस्ट लिहून राऊत यांनी वेगळेच संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे का? असं बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हमेश ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपको तीन भेंट दी हो, साथ, समय और समर्पण..' अशी फेसबूक पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.