मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधी मुख्यमंत्र्याचं ते वक्तव्य 'अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं' हे मागे घेण्याविषयी एक पत्र काढलं जात आहे, तसा मसुदा बनवला जात असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र तरी देखील भाजप आणि शिवसेनेतील वाद संपण्याच्या दिशेने जाताना दिसत नाहीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण संजय राऊत यांच्याकडून पुन्हा पुनरूच्चार 'फक्त मुख्यमंत्रीपद' या शब्दाचा पुनरूच्चार झाला आहे, तसेच शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमधून मड आयलँडकडे हलवले जात आहेत. कारण रंगशारदा येथे गैरसोय तसेच इतर कारणाने त्यांना हलवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.



रंगशारदा येथे शिवसेना कार्याध्यक्ष सायंकाळी 5 पर्यंत सर्व शिवसेना आमदारांशी संवाद साधणार आहेत. यानंतर हे सर्व आमदार मड आयलँडकडे जाणार आहेत. यासाठी एसी बस देखील तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.