मुंबई : दोन दिवसांपूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बॅंकांना बजावले होते की, रेपो दरात कपात करण्याता आली आहे. त्याचा फायदा ग्राहकांना बॅंकांनी दिला पाहिजे. या आवाहनानंतर देशातील सगळ्यात मोठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एसीएलआरमध्ये ०.०५ ने कपात केली. त्यामुळे कर्ज स्वस्त झाली आहेत. स्टेट बॅक ऑफ इंडियाने आपल्या  व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आजपासून गृह कर्ज, कार आणि व्यक्तिगत कर्ज स्वस्त झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केली. त्यानंतर स्टेट बॅंकेने आपल्या कर्जाच्या व्याज दरात कपात केली आहे. त्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या निर्णयाचा कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ०.०५ टक्क्यांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. नवीन व्याजदर हे आज बुधवारपासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यात रेपो दर ६ टक्क्यांवरुन ५.७५ टक्क्यांवर आणला. त्यानंतर स्टेट बॅंकेने सर्व मुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला.


स्टेट बॅंकेने वर्षभराचा किमान व्याज दर ८.४० टक्के इतका झाला आहे. चालू आर्थिक वर्षात बॅंकेने तिसऱ्यांदा व्याज कपात केली आहे. त्यामुले १० एप्रिलपासून गृहकर्जाचे व्याज दर ०.२० टक्क्यांनी केमी झाले आहेत.