मुंबई : Mumbai Police orders curfew : जगभरात आणि देशात कोरोनाचा धोका वाढत असताना आता राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईत 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरात मोठ्या मेळाव्यावर बंदी लागू राहील. 


तसेच मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच दुकाने, आस्थापना आणि सर्व सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश करण्याची परवानगी आहे. 



दोन दिवसांपूर्वी 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली होती. त्यानुसार मुंबईत नवी नियमावली लागू झाली आहे. मुंबईतील मॉल, हॉटेल, दुकानांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 50 टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. तसेच मॉल, दुकाने, सार्वजनिक वाहतूक इथे केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. 


थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ांवर पालिकेचा वॉच असणार आहे. 100 भरारी पथकं यासाठी नेमण्यात आली आहेत.  प्रत्येक वॉर्डात 2 ते 5 भरारी पथकं नेमून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, हॉल, पब, पाटर्य़ांच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी पोलिसांसह सरप्राइज व्हिजिट करणार आहेत. यावेळी मास्क न घातल्यास, गर्दी आढळल्यास रोख दंड किंवा साथरोग कायद्यानुसार कारवाई करणार आहेत.