मुंबई : हॉटेल ललित इंटरकॉन्टिनेंटलवर झालेल्या हल्ल्यातून शिवसेना नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २००९मध्ये हा हल्ला झाला होता. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनानं २५ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकलं होतं. याचा जाब शिवसेनेने विचारला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटेल व्यवस्थापनाला याचा जाब विचारण्यासाठी २१ जानेवारी २००९ रोजी हॉटेलवर शिवसेनेच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि हॉटेलची तोडफोड करण्यात आलीय. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत, अनिल परब, सूर्यकांत महाडिक, सीताराम दळवी यांच्यासह ६१ शिवसैनिकांवर हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश शिवडी न्यायालयानं दिला आहे.