COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'गणेशोत्सवाचा ज्यांना त्रास होत असेल त्यांनी स्मशानात जावं' असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं. 'कायद्याचा बडगा उगारत असाल तर आमच्याही हाती सोटा येईल', असं उद्धव ठाकरेंनी सुनावलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी त्यांच्या समस्यांसदर्भात संवाद साधला. मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. 


सरकारला सवाल 
'साडेचार वर्षात काय केलं त्याचं उत्तर द्या' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला केलायं. उत्सव हा आनंदात साजरा केला पाहिजे.