मुंबई : Drug Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जावई समीर खान (Sameer Khan) याची केस पुन्हा उघडण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau) स्थापन केलेल्या एसआयटीने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान याच्या गुन्ह्यात दोन जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. (SIT formed by Narcotics Control Bureau has summoned two persons for questioning in connection with a drug case involving Maharashtra minister Nawab Malik's son-in-law Sameer Khan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, NCBच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, जामीन अटींचे उल्लंघन केल्याबद्दल आम्ही मुंबई उच्च न्यायालयात समीर खान याचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत. त्यातच आता समीर खान गुन्ह्याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी बोलावले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.


समीर खान, सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि ब्रिटिश नागरिक करण सेजनानी यांच्यासह इतरांना NCB ने या वर्षी जानेवारीमध्ये ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. एनसीबीने दावा केला होता की, आरोपींनी गांजा खरेदी, विक्री करण्याचा कट रचला होता. समीर खान याच्या संपर्कात असलेल्या सेजनानीकडून बहुतांश औषधे जप्त करण्यात आली आहेत. 17 सप्टेंबर रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयाने समीर खान, फर्निचरवाला आणि सेजनानी यांना जामीन मंजूर केला होता.



समीर खान याच्या अटकेपासून मंत्री नवाब मलिक एनसीबीवर हल्लाबोल करत आहेत. नवाब मलिक आणि NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे क्रूझ ड्रग बस्ट चौकशीवर आमने-सामने आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्याने वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप केले आहेत. मात्र, हे सगळे आरोप NCB अधिकारी आणि केंद्रीय एजन्सीने फेटाळले आहेत.


मनीष भानुशाली आणि किरण गोसावी, मुंबई क्रूझ ड्रग बस्टमध्ये स्वतंत्र साक्षीदार असलेल्या भाजपच्या लिंकचा हवाला देत, राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. एनसीबीचे भाजपशी संबंध आहेत. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची अटक हे 'षडयंत्र' होते, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.