मुंबई : काही लोकांना राज्यघटना दुरुस्त करायची नसून घटना बदलायची आहे अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मुंबई विभागीय मेळाव्यात केली. पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदींना पर्याय काय हा प्रश्न विचारला जातो. पण एका दिवसात पर्याय उभा राहत नाही. मात्र सर्व एकत्र येऊन महाराष्ट्र हा पर्याय देऊ शकतो, अशी भूमिका पवारांनी मांडली. 


अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात ती ढासळली आहे. सामान्य माणसाचं जीवनमान खालावत असून, बेरोजगारीचं प्रमाण गेल्या ४ वर्षांत वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.