मुंबई: चेंबूर परिसरातील बाल आनंद आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडाता आला. या आश्रमाशाळेतील काही मुलांना अन्नातून विषबाधा झाली होती. यापैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. आणखी पाच मुलांवर झेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, आश्रमशाळेने ही बाब सर्वांपासून दडवून ठेवली. त्यामुळे आश्रमशाळेच्या हेतूबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. दरम्यान, या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर विद्यार्थ्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल. त्यानंतर कारवाईची दिशा ठरवता येईल, असे पोलिसांनी सांगितले.