मुंबई : वादळाची दिशा आणखी दक्षिणेला सरकल्यामुळे मुंबईचा धोका आणखी कमी झाला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाची खबरदारी घेण्यात आली आहे.  निसर्ग चक्रीवादळाची दिशा ५० किमी दक्षिणेला सरकली आहे. मुरुडच्या दिशेला वळलं वादळ आहे. अलिबागपासून ९५ किमीवर वादळ आले आहे. तर मुंबईला चक्रीवादळाचा धोका कमी असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रात अडकलेलं जहाज किनाऱ्यावर धडकले असून जहाजावरच्या १३ जणांना वाचवले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका असून काही तासांत हे वादळ धडकत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी वादळासाठी प्रशासन सज्ज असून जवळपास एनडीआरएफच्या २० टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून किनार पट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आले आहे. तसेच चक्रीवादळाचा परिणाम हवामानात झाला असून राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.