Jai Jai Maharashtra Majha : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा(Jai Jai Maharashtra Majha)… हे स्वर ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो आणि उर अभिमानाने भरुन येतो. आता याच ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीतचा दर्जा मिळाला आहे.  जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्याचा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येत आहे.


‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा दिला जाणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अखेर या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. या गीताला राज्यगीतचा दर्जा मिळाला आहे.  


महाराष्ट्र राज्याच्या अमृत मोहत्सवी वर्षा निम्मित प्रत्येक राज्याला एक गीत असावे असा ठराव केंद्रीय पातळीवर घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी  ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती.


या गाण्यातील दोन कडवी घेतली जाणार आहेत. हे गीत एक मिनिट किंवा दीड मिनिटाचे गीत करून हे राज्यगीत म्हणून सादर केले जाणार आहे. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे गीत राज्यगीत म्हणून सादर केले जाणार आहे.  सर्व शासकीय मोठया कार्यक्रमात हे गीत लावले जाणार आहे. या गीतामुळे संपूर्ण महाराष्ट्राला नविन उत्साह मिळेल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय.


महाराष्ट्र गौरव गीत अशी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताची ओळख आहे. सीमा आंदोलनाच्या काळात हे गीत चांगलच लोकप्रिय झाले होते. महाराष्ट्र मुक्तीच्या संग्रामात हे गीत सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरले.  कवी राजा बढे यांनी हे  गीत लिहिलेलं आहे.  संगीतकार श्रीनिवास खळे यांनी ही गीत स्वरबद्ध केल आहे. शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं ही अजरामर केले आहे.