मुंबई : मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी सेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर-वांगणी दरम्यान एक्सप्रेस रखडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.


दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक ठप्प झालीये. सकाळी ऎन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बदलापूर-वांगणी दरम्यान इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ही घटना घडताच रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पण दुरूस्ती कधीपर्यंत होईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.