मुंबई : दसरा मेळाव्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर ही टीका केली आहे. ' मुलं पळवणारी टोळी ऐकली पण आता बाप पळवणारे  आता दिसतात. अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.


अमित शाहांवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई बळकावयाची आहे. मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं फिरू लागली आहेत.  अमित शहा म्हणाले सेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहिती नाही की इथल्या जमिनीत तलवारीची पाती आहेत. मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे. अशी टीका त्यांनी अमित शाह यांच्यावर केली आहे.


'आमच्या आईवर वार करणा-याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. दस-यात लक्तरे काढणारच. कमळाबाईचा व मुंबईचा काय संबंध आहे. कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिलाय. वंशवाद कसला. मला अभिमान आहे घराण्याचा.' 


'२५ वर्षे आमची युतीत सडली. नालायक माणसं आम्ही जोपासली. वरती पोहचल्यावर लाथा मारायला लागलात. तुमचा वंश कोणता ? बाहेरचे उपरे किती घेतले तुम्ही. बावनकुळे की एकशे बावनकुळे. चित्ता करतो म्याव..चित्ता डरकाळी नाही फोडत. वरळी डेअरीच्या जागी जागतिक मत्स्यालय झाले पाहिजे. धारावीत आर्थिक केंद्र झाले पाहिजे.' असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय.


वेदांतावरुन आव्हान


वेदांतावरून धादांत खोटे बोलले जात आहे. वेदांता आणा,आम्ही तुमच्यासोबत येतो. मिंधे फक्त होय महाराजा म्हणत आहेत. दिल्लीत मुजरा घालायले गेलेत. संकटात धावून जाणारा शिवसैनिक असतो.