मुंबई : उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शेतक-यांना कर्जामाफीची घोषणा होऊनही राज्य सरकारने राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी अजून केलेली नाही. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.


पत्रकार परिषद घेत शेतक-यांची कर्जमाफी सत्याला धरुन करावी तसेच, कर्जमाफीनंतर सरकारने राज्यातील 89 लाख शेतक-यांची यादी जाहीर करावी. यामध्ये सर्व शेतका-यांची नावे आणि त्यांचा पत्ता असावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.