मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केला. गेल्या वर्षी सरकारने केलेल्या नोटाबंदीवरुनही ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदी-तुमचा हेतू चांगला असेल मात्र मार्ग चुकला आहे, रांगेत सगळे गरीब उभे होते, कोणी शेठजी उभा नव्हता. तेव्हा वातावरण असं केलं होतं की नोटबंदी विरोधात जो कोणी बोलेल तो देशद्रोही आहे. देशप्रेम काय असतं ते तुम्ही आम्हाला शिकवण्याच्या नादाला लागू नका, अशा शब्दात त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. 


प्रत्येकवेळी आपण आधी बोलतो आम्ही अडाणी म्हणून आधी बोलू लागलो, आता तज्ज्ञ लोकं बोलू लागले आहेत. नोटबंदी,जीएसटी सारखं धाडस दाखवलंत तसं कश्मीरचं विशेष दर्जा हटवण्याचं धाडस दाखवणार का नाही, असंही ते पुढे म्हणाले.