मुंबई: दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वैभव राऊत याला अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्थानिकांकडून मोर्चा काढण्यात आला.  यावेळी स्थानिकांनी एटीएसच्या कारवाईचा निषेध केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैभव ज्या परीसरात रहातो त्याच्या भंडार आळी परीसरातील लोकांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चात अनेक हिंदू संघटनांनीही सहभाग घेतला. भंडार आळी परिसरातून निघालेल्या या मोर्चाची सांगता नालासोपारा बस स्थानकात झाली.


वैभवला या प्रकारनात नाहक फसवल्याचा असल्याचा आरोप संतप्त गावकऱ्यांनी केला. हे आंदोलन असंच सुरु राहणार असून आंदोलन ते आणखीन तीव्र करु अशा इशाराही स्थानिकांनी दिला. वैभव हा गोरक्षकाचे काम करत होता. त्यामुळे त्याला या प्रकरात नाहक फसवल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.