प्रविण नलावडे, झी मीडिया,वसई : वसई पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडलाय. मागील तीन महिन्यांपासून हा पूल डागडूजीच्या नावाखाली बंद आहे. मात्र दुरूस्तीचं काम सुरू नव्हतं. अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर झी २४ तासनं या पुलाचं वास्तव समोर आणलं होतं. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.


दुरुस्तीवरुन वाद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र याची दुरूस्ती करायची कुणी यावरून रेल्वे, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खातं यांच्यात वाद सुरू होता.


त्यामुळे तीन महिने हा पूल बंद करण्यात आला होता. या पुलाच्या दुरूस्तीला सुरूवात झालीय. सध्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सुरू आहे.