मुंबई : मुंबईत विधिमंडळ इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये दिव्यांग लोकांनी आज दुपारी काही वेळ अभूतपूर्व गोंधळ घातला. हा गोंधळ घालतांना अन्नाची फेकाफेक केल्याने विधिमंडळचे कॅन्टीन एक तास बंद ठेवावे लागले होते. ही दिव्यांग लोकं राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची असल्याची माहिती आहे. कॅन्टीनमधील अन्न खराब असल्याचा दावा करत हा गोंधळ घालण्यात आल्याची माहिती आहे.