मुंबई : मुंबईकरांसाठी अतिशय अशी महत्त्वाची बातमी आहे. उपनगरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा (Water Supply) बंद असणार आहे. याबाबतची माहिती महापालिकेने (Mcgm) दिली आहे. जलवाहिनीचं काम असल्याने कारणाने या भागात एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  (water supply in mumbai suburban is closed from 8 30 am on tuesday may 31 to 8 30 am on wednesday june 1)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 31 मे रोजी काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार आहे.  मंगळवारी 31 मे ला सकाळी 8.30 वाजल्यापासून ते बुधवारी 1 जूनला सकाळी 8.30 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. लोखंडवाला वसाहतीत जलवाहिनी जोडण्याचं काम महापालिकने हाती घेतलंय. 


त्यामुळे मंगळवारी कांदिवली, बोरिवली, दहिसर आणि मालाड मधील काही परिसरात पाणी येणार नाही. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना पाणी जपूण वापरण्याचं आवाहन केलंय