मुंबई : पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईचे काही आकडे जाहीर केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ एक महिन्यात - फेब्रुवारीत केलेल्या कारवाईत पश्चिम रेल्वेने तब्बल ८९ हजार गुन्ह्यांची नोंद केलीय. या सर्व फुकट्या प्रवाशांकडून फक्त पश्चिम रेल्वे प्रशासनानं १० कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. 


पश्चिम रेल्वे प्रशासनाने एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तींविरोधातही कारवाई केली. त्यामध्ये २३ लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय. त्यामधून ९९ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. 


मागील वर्षाच्या तुलनेत ९.३६ टक्क्यांनी वाढ झालीय. पश्चिम रेल्वे कडक कारवाई करण्याची मोहिम सुरूच ठेवणार आहे.