मुंबई : मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आनंद साजरा करत आहेत. पण, आनंद कसला साजरा करता असा सवाल शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकार काश्मीर फाईल, पृथ्वीराज या चित्रपटांचे प्रमोशन करतेय. पण, याचवेळी काश्मीर पंडितांच्या, सीमेवरील जवान यांच्या होणाऱ्या हत्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहेत.


काश्मीरमध्ये देशाची, सीमेची सुरक्षा करणाऱ्या २० मुस्लिम जवान, अधिकारी यांची हत्या करण्यात आली. देशाच्या सीमेची सुरक्षा करतात म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. काश्मिरी पंडित यांचीही परिस्थिती काही वेगळी नाही.


या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मीर पंडित यांच्यामागे शिवसेना खंबीरपण उभी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्यामागे आहेच पण  मोदी सरकार काय करत आहे असा सवाल त्यांनी केला.