मुंबई : २४ ऑक्टोबरला महाराष्ट्र, हरियाणाचा निकाल लागला. हरियाणात काँग्रेस-जेजेपी सरकार येणार म्हणता म्हणता अमित शाहांनी तिथे सर्जिकल स्ट्राईक केला आणि भाजपा आणि जेजेपी सरकारचा शपथविधी देखील झाला.   पण अमित शाहांची तीच धडाडी आणि तीच सुपरअॅक्शन महाराष्ट्रात दिसत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड होण्यावेळीही अमित शाह येणार होते. पण आले नाहीत. त्यानंतर २ नोव्हेंबरला येणार होते. तेव्हा सुद्धा आले नाहीत, आणि आता अमित शाह येणार की नाही, याचं उत्तर भाजपाच्या कुठल्याही नेत्याकडे नाही.


निवडणुकीतलं तिकीट वाटप, जबाबदाऱ्या यावर संपूर्णपणे फडणवीसांची छाप होती. निकालानंतर मात्र भाजपाला अपेक्षित आकडा गाठता आला नाही. निवडणूक निकालानंतर शिवसेनेनंही गुरगुरायला सुरुवात केली. त्यावरुनही अमित शाह नाराज असल्याची चर्चा आहे.


ऱाज्यातली कोंडी फोडा, चर्चा सुरू करा, मगच मी येईन, असा निरोप दिल्लीनं धाडल्याचं समजत आहे. पण भाजपाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अमित शाहांना मातोश्रीवर दिवाळीच्या फऱाळासाठी जावंच लागेल, अशी सध्या तरी चिन्हं आहेत.