मुंबई : सावली माणसाची पाठ सोडत नाही... पण निसर्ग आणि काही भौगोलिक घटनांमुळे ही सावलीही पाठ सोडताना दिसणार आहे. मुंबईकरांना दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल, असं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलंय. उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने वर्षातून दोन वेळा 'शून्य सावली'चा (झिरो शॅडो) अनुभव घेता येतो. आपण असतो त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्यादिवशी सारखी होते त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठिक डोक्यावर येतो. मुंबईचे अक्षांश उत्तर १९ अंश आहेत. गुरुवार दि. १६ मे रोजी सूर्याची क्रांती उत्तर १९ अंश होणार असल्याने दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल आणि मुंबईकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येईल, असंही सोमण यांनी स्पष्ट केलंय. 


झिरो शॅडो डे

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
रविवार २८ जुलै रोजी पुन्हा सूर्याची क्रांती उत्तर १९ अंश होणार आहे. परंतु ते दिवस पावसाळ्याचे असल्याने शून्य सावलीचा अनुभव आपणास घेता येणार नाही. ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याणकरांना शुक्रवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येईल, असेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे.