मुंबई : बॉलिवुडचा दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख, या दोघांची आता चांगलीच मैत्री झालीय. बॉलिवुडचे हे करण अर्जुन आता केवळ फ्रेन्ड्स राहिले नसून, बेस्ट फ्रेन्ड्स झालेत... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड इंडस्ट्रीतील ते आहेत दोन सुपरस्टार... एक आहे बॉलिवूडचा किंग खान, तर दुसरा आहे दबंग खान... इडस्ट्रीचे ते आहे करण अर्जुन... दोघांचाही इंडस्ट्रीमध्ये आहे दरारा... दोघांचेही फॅन्स त्यांच्यावर आहेत फिदा  


सलमान खान आणि शाहरुख खान... या दोन्ही नावाचं वलय इंडस्ट्रीत गेली अनेक वर्ष झळाळत आहे. 'मैंने प्यार किया' म्हणत सलमानने चाहत्यांच्या दिलावर राज्य करायला सुरुवात केली तर दिवानाद्वारे शाहरुखच्या मागे असंख्य दिवाने फिदा झाले.


सुरुवातीची मैत्री त्यानंतरचे टोकाचे मतभेद आणि पुन्हा मैत्री असा या दोन्ही खानचा प्रवास... आणि याच प्रवासावर चाहत्यांच्या असलेल्या नजरा... करण अर्जुन, कुछ कुछ होता है, हम तुम्हारे है सनम अशा काही सिनेमांमध्ये शाहरुख आणि सलमानची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली. 


मात्र, यानंतर दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले. दोघेही सुपरस्टार स्वतंत्रपणे एकामागून एक हिट फिल्म्स देत होते. फॅन्सची संख्या वाढत होती. मात्र, दोन्ही खानमधला दुरावाही तितकाच वाढत गेला होता. २००८ मधल्या एका पार्टीत दोघांमधले मतभेद एकाक्षणी उघड झाले आणि दोन्ही खानमध्ये वादाची थिणगी आणखीनच पेटत गेली. त्यांच्या दुश्मनीचे किस्से गाजू लागले. फॅन्समध्ये आणि चाहत्यांमध्येही त्यांच्या वादावादीची जोरदार चर्चा झडू लागली.  मात्र, आमिर खानच्या बहुचर्चित 'थ्री इडियट्स' फिल्मच्या प्रमोशनच्या निमित्ताने आमीरसोबत सलमान आणि शाहरुख एकत्र झळकले आणि दोघांच्या मैत्रीचा पुन्हा एकदा एक नवा अध्याय सुरू झाला. अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर सलमानच्या सुलतान फिल्मच्या चित्रीकरणा दरम्यान शाहरुख सलमानची झालेली सेट भेट असो की दोघांनी एकत्र केलेलं सायकलिंग असो... ही मैत्री आता अधिक घट्ट होते आहे. ईदच्या मुहूर्तावर फिल्म रिलीज करण्याचा सलमानचा फंडा शाहरुखला भावू लागलाय. तर सलमानही शाहरुखचा फॅन झालाय.


दे टाळी

एकूणच काय तर खुलेपणाने दोघं एकमेकांची स्तुती करु लागलेत. एकमेकांच्या फिल्मची, भूमिकेची प्रशंसा करू लागलेत. एवढच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा स्वतः हजेरी लावून एकमेकांच्या फिल्मचं प्रमोशनही करू लागलेत. त्यामुळे एकमेकांचे कट्टर स्पर्धक राहिलेले हे दोघे आता जिगरी दोस्त बनलेत. मात्र याला एका जिव्हाळ्याच्या नात्याची जोड आहे. एक असा धागा जो या दोघांना एकत्र मैत्रीच्या बंधनात आणताना दिसला आणि तो म्हणजे सलमानची बहिण अर्पिता. अर्पिताच्या लग्नात सलमानच्या बरोबरीने शाहरुखची उपस्थिती लक्षवेधी होती. अगदी सख्ख्या भावाप्रमाणे शाहरुखने अर्पिताच्या लग्नात हजेरी लावली. त्यामुळे आख्ख्या इंडस्ट्रीत तो आणखी चर्चेचा मोठा विषय बनला होता. आत्तापर्यंत फक्त ईफ्तार पार्टीपुरतीच एकत्र झळकणारी ही जोडी आता बऱ्याच प्रमाणात एकत्र दिसू लागल्याने दोघांचेही चाहते खूष असणार यात शंका नाही... थोडक्यात काय, तर आता दुश्मनी खतम, दोस्ती झिंदाबाद...